Friday, November 03, 2006

 

उमज..

तू कविता पाडलीस तेंव्हा
न राहवून मी ग्रेस खाली ठेवले
आरती प्रभुंना वंदन केले
अन् कविवर्य कुसुमाग्रज आठवले..

यथाशक्ती रसग्रहण करताना
रसस्वादाला दिशा मिळेना
आशयातील तोचतोचपणानी
करवादलेला जीव आवरेना..

समस्त संग्रहांना बिलगून
काळीज कापत आसवे
हनुवटीवरुन ओघळून
सरसर घरंगळत गेली..

ओळीओळीतून उमजत गेले
भावना माझीही तिच ती
होती कविता मात्र दुसरी कुठली..

Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?